✍️"वृक्ष वल्ली" ✍️ मराठी कविता.
✍️"वृक्ष वल्ली"✍️
झाडं लावा, झाडं जगवा,
चालत राहुदे रान मेळावा.
करू नका हिरवळीशी हेवा,
झाडच करील शुद्ध हवा.
जिथे असेल सुंदर से रान,
औषधी प्राप्ती होईल महान.
रोग - राई पासून मुक्त जीवन,
कां मग ठेवू नये पर्यावरण मान.
रुजू दे पाळ-मूळ धरणी मातीत,
पाण्याच्या टंचाईचा होईल अंत.
वाहती माती पण होईल रक्षित,
झाडेच ठेवील धरणीला सजीवंत.
मंदिरां विना देवाची पूजा करू,
सृष्टीतील देव आहे कृपाकरू.
हर-हरी देवांना निसर्गी न्याहारु,
तेहतीस कोटी वृक्षांचा संच उभारू.
हिरवळीत काजवे प्रकाशातील,
फुलपाखरु थवे नाचतील.
किलबिल पक्षांचा आनंदी गातील,
वाघ-हत्ती गर्जना करतील.
आरोग्य लाभेल बाळ-गोपाळां,
चारा खाण्यास जमेल मेळा.
आम्ही पण खाऊ पाला- पाचोळा,
उन्हाळ्यात जाणवेल हिवाळा.
निसर्ग चक्र आहे छान,
स्वार्थी हाणीले वृक्ष मदान.
कंठ दाटीले अश्रुमय झाले नयन,
कसे गाणार वृक्ष वल्ली गुणगान.
कवी: नरसिंहदास र. मातोंडकर
(शिवदास)
मडगांव - गोवा.
🌲पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌲

Comments
Post a Comment